कविता

June 7, 2023

प्रार्थना

मी आस्तिक आहे की नास्तिक, या निष्कर्षापर्यंतचा रस्ता सोपा नाही पण रंजक आहे. मी त्यावर चालतो, कधी भलत्याच पायवाटेने जातो, कधी विसावून एका जागी बसतो, कधी उलटा वळून चालू लागतो, कधी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलोय म्हणून सुस्कारा टाकतो तर पुढे वळणावळणाचा घाटच सुरू झालाय असं आढळतं, तर अनेक वेळा या निष्कर्षापर्यंत […]
May 12, 2023

ढवळल्या आभाळाची नको मागू काही खूण

“चारच ओळी आहेत पण गाणं पूर्ण वाटायला हवं.“ हा एकच विचार माझ्या मनात रेंगाळत होता. कारण आता गाणं रुक्मिणीचं नसून कृष्णाचं होतं. समीरच्या त्या सिटिंग-रूममध्ये बसून तात्त्विक विचार करायला अजिबात वेळ नव्हता. पण कुठलंही सृजन हे मूलतः बौद्धिक (intellectual) नसतं असं माझं अनेक वर्षांनंतर मत झालंय. याचा अर्थ असा नाही […]
April 25, 2023

ओसरला दिनमणी

सगळी वाद्य आणि यंत्र लावून होईपर्यंत तोवर संध्याकाळचे ५ वाजले होते आणि उन्हं उतरायला सुरुवात झाली होती. तापस सरांनी लिहिलेली पहिली कविता पाहिली. शब्द होते – ओसरला दिनमणीफुंकरली तेजवातघणघणला घंटानाददेवळात मंदिरातकृष्णगृही शांततेतअवतरली क्लांत पदे,“बोल सख्या, बोल बोल!”कशी पाहू तुजकडे! – विजय तापस (संगीत अखेरचा रास) दिवस ओसरत चालला तरी श्रीकृष्ण […]
March 20, 2023

शाश्वताची शोधयात्रा

असं काय आहे कवितेत की माणसाला कवितेतून व्यक्त व्हावंसं वाटतं? या गोष्टीचं मला कायम कुतुहल वाटत आलं आहे. एखादा निबंध, एखादी कथा किंवा कादंबरी अधिक स्पष्टपणे अभिव्यक्ती करण्यासाठी उचित आकृतिबंध नाही का? याचं उत्तर असं असावं असं मला वाटतं – केवळ व्यक्त होणं ही माणसाची ऊर्मी नसते, तर आपण म्हटलेलं […]
September 30, 2022
Shankar Vaidya at Shubhra Kalya Moothbhar Album Release

दीपस्तंभ

रवींद्र नाट्यमंदिर या मुंबईच्या सभागृहाच्या पुरुषांच्या प्रसाधनगृहात योगायोगाने एका विद्यार्थ्याची भेट एका कवीशी होते आणि अवघ्या ३ मिनिटाच्या कालावधीच्या त्यांच्या संभाषणातून विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्याचं गमक सापडतं. या एका वाक्यावरून हे एका काल्पनिक कादंबरीच्या ब्लर्बवरील वाक्य आहे असं कुणालाही वाटू शकेल. आणि तरीही हे माझ्याबाबतीत घडलं आहे. २३ सप्टेंबर २०१४. सकाळी […]
November 8, 2021

पुलंच्या दोन भेटी

दर वर्षी या दिवशी मला पुलंची ही भेट आठवते. चांगलं दोन अडीच तास पुलंच्या सहवासात घालवलेला हा वेळ मला आयुष्यभर पुरेल!‘कवितेला चाली देऊन त्यांचा कार्यक्रम का करावासा वाटला?’ या त्यांच्या प्रश्नाला माझ्यातल्या नवख्या, अतिउत्साही आणि त्यांच्या कौतुकाने हुरळून गेलेल्या संगीतकाराने – “मला काहीतरी वेगळं करायचं होतं” असं त्या वेळी भारी […]
July 16, 2015

एक साहित्यिक वारी

वारीचे दिवस पुन्हा सुरू झाले आहेत. काही वर्षांपूर्वी पंढरपूरच्या वारीची माहिती देणाऱ्‍या एका संकेतस्थळाचं माझ्या हस्ते पुण्याच्या एस्.एम्. जोशी सभागृहात उद्घाटन झालं. एका अध्यात्मिक विषयावर, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने केलेल्या संकेतस्थळाचं, एका समाजवादी नेत्याच्या नावावर असलेल्या सभागृहात उद्घाटन होतं – हे फक्त भारतातच होऊ शकतं! पण जे परमेश्वराला मानत नाहीत ते त्याच्या (तिच्या) संतांना मात्र मनापासून मानतात […]
August 16, 2014

या शुभ्र विरल अभ्रांचे…

मराठी चित्रपट आणि भावगीतांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या विभ्रमांना जे स्थान आहे, कदाचित तेच स्थान निसर्गाला आहे. अनेक निसर्गगीतं आपल्या परिचयाची आहेत. बर्‍याच निसर्गगीतांमध्ये निसर्ग हा मानवी भावनांसाठी रूपक म्हणून वापरल्याचं आपल्याला आढळतं. निसर्गाच्या रूपकांमधून मानवी संबंधांचा व्यवहार काव्यात्म पद्धतीने मांडलेला दिसतो. उदाहरणार्थ – फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरीखोर्‍यातून वाहे […]
August 9, 2014

सूर आणि संस्कृती

कुठूनसे भटियारचे सूर कानावर आले आणि मला जाग आली. पडदे लावलेलेच होते, पण भटियारमुळे सकाळचं वातावरण तयार झालं होतं. मग पडदे उघडले आणि सूर्याची कोवळी किरणं खोलीत सांडली. आपल्या रागसंगीतामध्ये प्रहराप्रमाणे राग गायले जातात याचं मला अगदी पहिल्यापासून कुतूहल आहे. भैरव, ललत, सकाळीच का? मारवा, पूर्वी संध्याकाळीच का? असे अनेक […]
June 30, 2010

खिडकीएवढे आभाळ

(हा लेख ‘सकाळ’ मध्ये ‘गुड मॉर्निंग’ या सदरात दि. ३० जून रोजी छापून आला आहे.) हे सगळे लेख मी माझ्या खोलीत संगणकावर लिहितो. समोर संगणकाचा स्क्रीन आणि उजव्या हाताला एक खिडकी असं एकंदर नेपथ्य या सगळ्या लेखनप्रक्रियेला लाभलेलं आहे. जरा कंटाळा आला किंवा सुचेनासं झालं की मी या खिडकीबाहेर एक […]